आदिवासी विकासाचा निधी आता मंदिरांसाठी ..!
अक्लमंद हो तो क्या लिखो ? - Himanshu Kumar
मन की उडान हो गई जो स्वच्छंद लिखो
तितली लिखो, फूल लिखो,
रेशम लिखो, प्रेम लिखो,
जो भी लिखो,
प्रशंसा, पैसा और सम्मान के जरूरतमंद लिखो,
ठसक और खनक लिखो,
देश, विश्व, सत्ता के बदलते समीकरण लिखो,
अच्छा लिखो, नफीस लिखो,
ऊँचा लिखो, दमकदार लिखो,
जिनकी पढ़ने की हैसियत है,
उनकी हैसियत के अनुसार लिखो,
शोहरत वाला लिखो, चर्चा लायक लिखो,
छप्पर मत लिखो, साथ में नाला मत लिखो,
खून मत लिखो, भूख मत लिखो,
सडती हुई लाश पर मंडराते चील, कौवे मत लिखो,
औरत की कोख में ठूंसे गये पत्थर बिल्कुल मत लिखो,
देश मत लिखो, समाज मत लिखो,
गांव मत लिखो, गरीब मत लिखो,
हवाई अड्डा और होर्डिंग लिखो,
ए.सी. लिखो, कार लिखो, स्काच लिखो,
सेंट लिखो, लड़की लिखो,
पैसा लिखो, मंत्री लिखो,
साहब लिखो, फाइल क्लियर लिखो,
पिटा हुआ बुढा बिल्कुल मत लिखो,
पुलिस की मार, फटा हुआ ब्लाउज ,
पेट चीरी हुई लड़की की लाश मत लिखो,
नाच मत लिखो, ढोल मत लिखो,
लाल आँख मत लिखो, तनी मुट्ठी मत लिखो
जंगल से आती हुई ललकार मत लिखो,
अन्याय मत लिखो, प्रतिकार मत लिखो,
सहने की शक्ति का खात्मा और बगावत मत लिखो,
संघर्ष मत लिखो, आत्म सम्मान मत लिखो,
लाईन है खींची हुई, अक्लमंद और पागलों में,
अक्लमंद लिखो , पागल मत लिखो
आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर फिर से विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....?
आदिवासी समाजाचे अस्तित्व या निवडणुकितील प्रलोभनांना दान करू नका.
जय आदिवासी, जय एकलव्य, जय बिरसा मुंडा
अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?
राजकारण हे एक साधन आहे शासन चालवण्या साठी, आणि राजकीय पक्ष एक घटक. राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी हित जपण्या साठी त्यांना जमेल त्या मार्गाने जो पक्ष विचार धारा आवडेल त्या मार्गाने प्रयत्न करावे आणि ज्यांना आवडेल त्यांनी सहकार्य करावे. आदिवासी हित जपणे हे आपले धेय्य आणि उदिष्ट असताना पक्ष/नेते/विचारधारा यांच्या नावाने आपले विभाजन का करावे ना?
एक आदिवासी म्हणून सगळ्यांना एक विनंती, आपल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्तित्व साठी प्रामाणिक नेतृत्व निवडून दया. (एक संवेधानिक प्रथा म्हणून)… अन्यथा हजारो वर्ष पासून आपल्या आदिवासी समाजात परंपरेने असलेली लोकशाही जगाला आदर्श शिकवणारी आहे. तेथे सगळेच समान असतात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येते. न वयाची मर्यादा न जाती पातीची, सर्व समावेशाक आणि पारदर्शक म्हणून जगातील अनेक नामवंत आणि यशस्वी उद्योग समूह याचा अवलंब करीत आहेत. आणि दुर्दैवाने आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आदिवासींना राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजातील एकात्मता नष्ट करू पाहत आहेत.
आयुश (आदिवासी युवा शक्ती) परिवार कडून सगळ्यांना विनंती आहे आपले जे राजकीय विचार असतील ते ठेवा पण आपण आदिवासी समाज एक कुटुंब आहोत हि भावना जतन करूया !
www.jago.adiyuva.in
Adivasi vikas??
Save tribal save nation!
:तालुक्यातील २५ गावे आदिवासी क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. वास्तविक या गावांमध्ये ९८ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे. असे असताना ही गावे वगळल्याच्या निषेधार्थ डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारो आदिवासी या मोर्चात सहभागी झाले होते.
नंदुरबार तालुक्यातील हजारो आदिवासी दुपारी महाराणा प्रताप चौकात जमले होते. तेथून त्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जून २0१४च्या राजपत्रात नंदुरबार तहसील अनुसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यात जाहीर करण्यात आलेल्या गाव, पाडे, वस्त्या यानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात नंदुरबार तालुक्यात ९७ ग्रामपंचायती, १0७ गावे समाविष्ट असून राजपत्रात फक्त ८२गावांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित २५ गावे समाविष्ट नाहीत. यामुळे विशेष अधिकाराच्या लाभापासून आदिवासी नागरिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण वंचित राहणार आहेत. शासन निर्णयानुसार माडा, मिनीमाडा, आदिवासी उपयोजना क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र ठरविण्यात आले आहे. वास्तविक वगळण्यात आलेल्या या गावपाड्यांमध्ये ९७ ते १00टक्के आदिवासी जनता राहते. या निर्णयामुळे सुशिक्षित आदिवासी तरुणांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीवरही टाच आली आहे. त्यामुळे आदिवासी बेरोजगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या सर्व बाबींचा विचार व्हावा याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून पुन्हा या गावांना आदिवासी योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मोर्चाचे नेतृत्व डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी या�
: Ha tar ghor Anyay haye: आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी यांनी केले. या वेळी राजेंद्र पवार, रमेश गावीत, धरमदास बागुल, भरत बागुल, दत्तू चौरे, देवमन चौरे, देवमन पवार, शत्रुघ्न गांगुर्डे, पूनम बागुल, सोमा गांगुर्डे, उत्तम चौरे, रामलाल बागुल आदींसह हजारो आदिवासी युवक व नागरिक सहभागी झाले होते.
■ नंदुरबार तालुक्यातील देवपूर, भवानीपाडा, निमगाव, पिंप्री, वडगाव, बालआमराई, काळंबा, पाचोराबारी, सोनगीर, सुतारे, अंबापूर, हरिपूर, नवागाव, श्रीरामपूर, अजेपूर, घोगळगाव, गंगापूर, तारापूर, राजापूर, ईसाईनगर, शिवपूर, नंदपूर, मालपूर, वागशेपा, उमरगाव, चौपाळे, नांदर्खेपैकी टाकळीपाडा, वाघाळेपैकी काळटोमी या गावांचा समावेश आहे. या गावांना वगळले
तुम्हाला काय वाटते नक्की कळवा.
आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा
आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ………
अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय ….
याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली आहे …. परभणी मधील राष्ट्रवादी भवन आदिवासी वस्तीग्राहतील विद्यार्थ्यांनीफोडले या कारणामुळे कुठलीही शहानिशा न करता वस्तीग्र्हातील दिसेल त्या विद्यार्थ्यावर मारहाण करून गुन्हे दाखल केले ….
या बाबत आदिवासी प्रेकल्प अधिकारीकिवा वस्तीग्र्हा ग्रहपाल यांना पूर्व कल्पना किवा परवानगी घेणे गरजेचे आहे,अत्यंत गंभीर गुनेह्गार आहेत अशी वागणूक या मुलांना मिळाली…
माझा प्रेश्न आहे या यंत्रणेला तुम्ही गंभीर गुनेह्गाराला किवा राजकीय आंदोलकांना सुद्धा या प्रेकारची वागणूक देत नाही ती या पोलिसांनी शिकणाऱ्या आदिवासी मुलांना दिली …
दुसरी घटना या पेक्षा गंभीर असून आदिवासी संघटनांना विचार करण्यास व न्याय कुठे माघावा हाप्रेश्न तुमच्या समोर येणार आहे ….
भोकर जि . नांदेड येथील पाढूरणा संस्थेची आदिवासी आश्रम शाळा असून येथिल संस्थेचा मुजोर संस्थाचालक वारंवार मुलांना त्रास देत होता या बाबत सर्वन समक्ष व पोलिस समोर एका मुलीला धक्का सुधा दिला …
या बाबत पालक,समाजसेवक ,विद्याथी जाब विचारण्यास गेले असता लाठीमार झाला त्यातून दगडफेक झाली व काही पोलिसांना गंभीर दुखापत झाली ….
पण नंतर जी दडपशाही झाली त्यामध्ये समंदर वाडी व काही गावात जाऊन महिला व निष्पाप लोकांना अमानुष मार खावा लागला अजूनही कित्यक आदिवासी बांधव त्यांच्या गावामध्ये किवा शाळेतील मुले त्यांच्या शाळेमध्ये किवा घरी सुधा गेली नाही ….
माझ्या मित्रानो या गावकर्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे ते गावकरी पोलिसांच्या भीतीने जंगलात जाऊन लपले आहेत व प्रेचंड घाबरले आहेत ……
या घटनेचा निषेध आपण करावा व सर्वच जिल्ह्यांमधून आदिवासी संघटनांनी या विद्यार्थी तसेच गावकरी यांच्या मानसिक छ ळा बद्दल निवेदने पाठवावेत व मानवहक्क आयोगाकडे दाद माघावी व या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या अधिकार्यावर अनुसचीत जाती -जमाती कायद्यानुसार कार्यवाही व्हावी हि मागणी आपण शासनाकडे करावी हि माझी आपल्याला विनंती…।
यशवंत पावरा.शिरपूर
(आदिवासी कार्यकता )
आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे
जीवनातील प्रत्येक क्षण आदिवासी समाज संघटीत करण्यासाठी - विजय पवार
आरक्षणविरोधाची अजितदादांना धग
राष्ट्रवादीतर्फे नंदुबारमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पवार आले असता, आदिवासी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्यासाठी नंदुरबार-धुळे चौफुलीवर गर्दी केली होती. या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले. त्यानंतर गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. मात्र, थोड्याच वेळात आंदोलकांनी नवापूर चौफुलीवर पवारांच्या गाड्यांचा ताफा रोखून धरत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

लगता है पूरा planning बनाया सालो ने आदिवासीओं को मिटाने का....!
जिंदगी ही असली सबूत है दुनिया इस मायाजाल में।
इतिहास के पन्ने आज भी खाली है आपकी बुलंदी आवाज में ।

आज अनेक जाती आदिवासी आरक्षणावर हात टाकत आहेत.
आदिवासी संघर्ष

अशिक्षित, असंघटित आदिवासींना आरक्षणासाठी बकरा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे
१९४९ मध्ये घटनेत अंतर्भूत केलेल्या बाबींनी आदिवासी कोण हे निश्चित करून कलम तयार करण्यात आले आहे. १९७६ मध्ये आदिवासींच्या आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात आले. धानगड ही ओहराण जातीची उपजमात आहे. त्याचा धनगराशी कुठलाही संबंध नाही, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी १९८१ मध्ये धनगरांकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. आता मात्र राजकीय बाब पुढे आली असून संपूर्ण धनगरच आदिवासी असल्याचे सांगत आहे. धनगरांना आरक्षण देण्यास आदिवासींचा कोणताच विरोध नाही. केवळ आदिवासींचे अधिकार हिरावून धनगरांना आरक्षण देणे चुकीचे आहे. धनगरांना आरक्षण देताना घटनात्मक तरतुदींच्या सूचींचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. कायदे, न्याय व्यवस्था आणि घटना यापेक्षा शासनाचा जीआर महत्त्वाचा नाही. यापूर्वीच धनगराला व्हीजीएनटी म्हणून साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे. आता धानगडचे धनगड आणि धनगडचे धनगर असा अर्थ लावून आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण केले जात आहे. अनुसूचित जाती या संघटित आणि जागरूक असल्याने त्यांच्या वाट्याला जाण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. या उलट अशिक्षित, असंघटित आदिवासींना आरक्षणासाठी बकरा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल, असेही आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

एक लाख पाच हजार 'बोगस आदिवासींना’ नोकर्या
http://

सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद
मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे.
आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.
राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.
आदिवासी आता जागा झाला आहे....नक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात घ्यावा लागेल.
प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्म....यातून देशाच्या विकासात आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून पुढे येईल.
सामाजिक स्वास्थ्य हे सर्वांच्या एकीवर अवलंबून असते. परंतु आजची ही राजकीय हरामी मंडळी या एकीवर कु-हाड चालवत आहेत. ज्यांनी सावरायला हवे तेच बोटं समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.
वास्तविक आरक्षण हा विषय या राजकारणी व्यक्तींचा नाहीच मुळी....तो लोकसभेच्या अखत्यारित आहे. हे माहीत असतानाही फक्त आणि फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी जणु काही हे नेते प्रयत्नशील आहेत.
परकीय शक्तिन्नी आपल्या देशात येवून एखादा खुप मोठा विनाशकारी प्रयत्न करावा या प्रकारचे कार्य काही नेते करत आहेत.
जंगलचा राजा म्हणजे आदिवासी.....आज जागा झालाय हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पण त्याने कुणाची शिकार करू नये असे वाटत असेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.
विद्रोही
आदिवासी संघर्ष

खरा आदिवासी आवाज कुठे आहे?
पण खरा आदिवासी आवाज कुठे आहे? पिचड, वळवी, पुरके, मोघे
