Breaking News
Showing posts with label Political. Show all posts
Showing posts with label Political. Show all posts

आदिवासी विकासाचा निधी आता मंदिरांसाठी ..!

आदिवासी विकासाचा निधी आता मंदिरांसाठी ..!
आदिवासींच्या विकासासाठी स्थापण करण्यात आलेले आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाबद्दल किती जागृत आहे हे सर्वांना दिसताच आहे . महाराष्ट्राचाच विचार केला तर आदिवासी विकासाच्या योजना अध्यापही ८०% आदिवासींपर्यंत पोहचल्या नाहीत . आदिवासी विकासाचे प्रश्न वातानुकुलीत रूम मध्ये बसून तयार केले जातात तर आदिवासींच्या कुपोषणावर पंचपक्वान्नाच्या जेवणावर ताव मारून विचार मंथन केले जाते . आदिवासींच्या योजना किती लाभार्थींपर्यंत पोहचतात याचा विचार केला तर हा आकडा आहे २० % . आजही ८०% आदिवासी समाज आदिवासी विकासाच्या योजनांपासून दूर आहे .ज्यांना लाभ मिळतो ते एक तर दलालांना मध्यस्थी टाकून किंवा नेत्यांच्या ,पुढारी लोकांच्या पाया पडून. एखादी योजना मिळवायची तर योजनेच्या किमतीच्या १० % रक्कम दलाल ,प्रवास , योजना फॉर्म ,अश्या बाबींवर खर्च होते . आज आदिवासी विकासाचा मूळ मुद्दा बाजूला राहिला असून आदिवासी विकासासाठी असलेला निधी , रस्ते , आपत्ती निवारण , धरणे , बांध , शेती विकास , पर्यटन विकास यासाठी खर्च केलाच जातो त्यातच आता पर्यटन विकासासोबत मंदिरं बांधकामाला देखील या निधीचा वापर केला जात आहे. मंदिर म्हटले कि श्रद्धा आलीच मात्र याच श्रद्धेचा कमिशन म्हणून चांगला वापर केला जात आहे . मंदिरांसाठी करोडो रुपये निधी मंजूर करायचा आणि त्याच परिसरात राहणारा आदिवासी माणूस रोजगारासाठी मर मर मारतोय . एक घरकुल मिळवायला वर्षानुवर्षे आदिवासी विकास कार्यालयाच्या चकरा मारतोय , डिझल इंजिन मिळवता मिळवता मे महिना लागून विहिरीचे पाणी आटते . तरीही त्याला आवशक असलेल्या योजनेचा लाभ मिळत नाही मात्र मंदिरांसाठी सहज निधी उपलब्द्द होतो . अंजेनेरी ता. त्र्यंबकेश्वर येथे गणपती मंदिरासाठी ३९ लाख २४ हजार ५१० रुपये तर भंडारदरा ता. अकोले जि. अ.नगर येथील रंधा धबधबा जवळ असलेल्या घोरपडा देवीच्या मंदिरासाठी २ कोटी ७९ लाख ८२ हजार रुपये देण्यात आले आहेत तसेच कळवण ,सटाणा , मालेगाव ,पेठ ,दिंडोरी या ठिकाणी देखील आदिवासी विकासासाठीअसलेले करोडो रुपये खर्च करून मंदिरे बांधण्यात येणार आहेत . ज्या गावांमध्ये हि मंदिरे उभी राहिलीत तेथील तेथील सामाजिक प्रश्नाचा विचार केला तर या ठिकाणी मंदिरांची नाही तर आदिवासींच्या रोजगार निर्मितीची गरज अधिक होती असे नक्की दिसेल . आणि आदिवासी माणूस मंदिराबाहेर हार ,फुलं नारळ विकत बसला तर नक्कीच आहे ते गमवावे लागेल . दगडाच्या मुर्त्यांची काळजी करून त्यांना करोडो रुपयांचा निवारा करायचा आणि जिवंत माणसे कशी राहतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे . मंदिर बांधकामात मोठ्या प्रमाणात कमिशन काढून नेते पुढारी ठेकेदार सुस्त झाले आहेतच मात्र श्रेय लाटण्यातही मागे नाही .त्र्यंबकेश्वर परिसरातील एक स्वयंघोषित नेता म्हणतो कि माझ्यामुळेच मंदिर झाले आणि रंधा धबधबा येथील मंदिराला कुणाच्यातरी मुलाच्या स्मरणार्थ बांधल्याचा मोठा बोर्ड लावलाय ...! निधी आदिवासींचा , आणि तो निधी खर्च करून स्वताचे स्मरण ..? त्याच परिसरात २७९.८२ लाखाचे गरजू आदिवासिना घरकुले बांधली असती तर ३०० आदिवासी कुटुंबाना छत मिळाले असते आणि अंजनेरी येथील घरकुलांचा प्रश्न कायमचा सुटला असता . विशेष म्हणजे येवढा निधी खर्च होऊन देखील त्याचा लेखा परीक्षण अहवाल आदिवासी विकास विभागाला अध्याप प्राप्त झालेला नाही . मंदिरांऐवजी गाव तिथे वाचनालय अशी संकल्पना राबवायला आमच्या आदिवासी नेत्यांना काय लाज वाटतेय का ..? हीच मंदिरे पुढे ट्रस्ट मध्ये रुपांतर होतील आणि पुन्हा त्याच परिसरातला आदिवासी माणूस त्याच मंदिरासमोर भिक मागायला बसेल का .
विजयकुमार घोटे
Read more ...

ना. विष्णु सवराना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरात आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन

आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा अध्यक्षतेखाली नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक जिल्हा आदिवासी संघटना प्रतिनिधीची बैठक झाली... या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून राज्यभरात निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा आणि त्यांची सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब, नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव पांडू गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात सर्व आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्याचे ठरविले आहे. दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे जिल्हाधिकार कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी महादेव कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष शहर पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल हजर होते. नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन करणार आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी www.jago.adiyuva.in
Read more ...

Adivasi and indian constitution

  आदिवासी आणि भारतीय राज्यघटना :
आदिवासी या भूमीचा मूळ रहिवासी आहे मात्र भारतीय राज्यघटना आदिवासिना आदिवासी म्हणत नाही तर “ अनुसूचित जमाती “ म्हणते .आदिवासी जमाती या शब्दाचा अर्थ आदिवासी होतो असे जगातल्या कोणत्याच शब्दकोषात लिहिलेले नाही .कोलंबसाच्या आगमनाने जगात वसाहती निर्माण झाल्या ,ज्या युरोपीय देशात वसाहती निर्माण झाल्या त्याच देशातील आदिवासिना “जमाती “असे म्हटले गेले आहे .खरे तर “ जमाती “ हि संकल्पना युरोपियन वसाहतवादाची जननी आहे .अमेरिकेतील रेड इंडियन आदिवासींच्या जमिनीवर युरोपियन वासाह्तीद्वारा अधिसत्ता निर्माण केली गेली हे कोलंबसाच्या “ डिस्कव्हरी थेरीचा “ एक भाग होता वसाह्तवादामुळे झालेल्या नुकसानीची प्रतिपूर्ती करण्यासाठी अमेरिकेतील आदिवासिना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात आरक्षित जमिनी देण्यासठी अमेरिकेने “ Tribal Reservation Act-1830” निर्माण केला हा कायदा तयार झाल्यानंतरअमेरिकेतील रेड इंडियन आदिवासिना “ जमाती “( Tribes) संबोधण्यात आले
भारतात “ Tribes “ या शब्दाची उत्पत्ती कोणत्याच भाषेपासून झालेले नाही “ Tribes “ शब्द हा ग्रीक राज्याच्या रोमन राजाद्वारा झालेली आहे . The term “Tribes originated around the time of Greek city States and early formation of the Roman Empire. Latin term “Tribes” has since been transformed to mean. ( By Robert J. Gregory ) भारतामध्ये ब्रिटीश प्रशासनाने आदिवासिना गुन्हेगार ठरवणारा कायदा गुन्हेगारी जमाती कायदा १८७१ ( Criminal Tribal Act 1871 ) निर्माण केला अश्या प्रकारे १८७१ मध्ये आदिवासिना इंग्रज सरकारने आदिवासिना “ Tribes” म्हणून घोषित केले .
भारतीय घटनेत आदिवासिना वेगळ्या संस्कृतीक मूल्यांच्या व त्यांच्या वेगळ्या वांशिक गटांच्या आधारावर “ आदिवासी किंवा मूलनिवासी “ असे व्याख्याबद्ध करणे गरजेचे होते , तसे कधी झाले नाही. घटना समितीद्वारे मोठ्या चर्चे नंतर भारतीय आदिवासिना राज्यघटनेत काय म्हणावे हा प्रश्न कायम राहिला पुढे हा वाद ब्रिटीश सर्वोच्य न्यायालयात गेला ,त्या न्यायालयाला भंग करून “भारतीय सर्वोच्य न्यायालय “ स्थापन करण्याच्या नादात आदिवासी व्याखेचा प्रश्न कायम अनिर्णीत राहिला व राज्यघटनेत आदिवासींची व्याख्या केली गेली नाही व पुढील काळात ते आजपर्यंत युरोपियन वसाहतवादाचे अनुसूचित जमाती ( Slavery Code ) नावाच शिक्का आणि गुलामगिरीचे ओझे कायम राहिले . आदिवासींचे सांस्कृतिक मुल्ये नाकारून मूलनिवासी अस्तित्व नाकारण्यात आले . भारतीय घटना समितीवर आदिवासींचे नेतृत्व करणारे मा. जसपाल मुंडा म्हणाले कि ,आदिवासींवर सहा हजार वर्षापासून होत असलेली अन्यायाची पुनरावृती स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेत पुन्हा एकदा झाली आहे . जसपाल मुंडा यांनी आदिवासिना जंगली म्हणवणार्या घटना समितीच्या सदस्यांना ठणकावून सांगीताले कि आम्ही जंगली नाही या मातीचे मालक आहोत .तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कि राज्यघटनेत “ schedule tribe “ हा शब्द अंतिम असेल असे मी मानत नाही . येव्हडे असूनही पुढील साठ वर्ष्याच्या काळात आमच्या नेत्यांनी आदिवासींच्या नावावर निवडणुका लढवल्या ,सत्ता उपभोगली , मात्र schedule tribe हा शब्द बदलून आम्हाला “ आदिवासी किव्हा मूलनिवासी “ करा म्हणून एकदाही प्रयत्न्न केले नाही . निवडणूक आणि सत्तेच्या नादात आदिवासी माणसाला आमच्याच नेत्यांनी गुलामगिरीत टाकले जेव्हडे इत्तर लोक आदिवासी समाज्याच्या गुलामगिरीस कारणीभूत आहेत त्यापेक्षा अधिक प्रमाणात आमचे नेते ,पुढारी कारणीभूत आहेत .कारण त्यांनी अआज देखील आदिवासी हाच शब्द घटनेत समाविष्ट करावा म्हणून प्रयत्न केले नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या किती राजकीय नेत्र्यांनी आज पर्यंत राज्घात्नेचा अभ्यास केलाय किव्हा “schedule tribe” हा शब्द कुठून आणि कसा आलाय व त्याचा अर्थ तरी काय होतो याचा अभ्यास केल नाही . आज आणि यापुढे आपण सर्व आदिवासी आपल्या हक्कांसाठी नेहमीच लढत आलो आहोत मात्र एक लढा यापुडे आपले “ आदिवासीपण” राज्यघटनेत पुन्हा यावे म्हणून प्रयत्न करावे लागणार आहे आम्ही schedule triba नसून आदिवासी आहोत आंनी घटनेने आम्हाला सन्मानपूर्वक आदिवासीच म्हणावे म्हणून एक लढा उभावाराव लागणार आहे . मितानो हे विचार सर्व आदिवासी समाजसेवक ,अभ्यासक विचारवंत , आणि सर्व आदिवासी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे जातीचा दाखला मिळवतांनी आम्ही schedule tribe नसून आदिवासी आहोत हे ठणकावून सांगण्याची ताकत ,हिम्मत तयार झाली पाहिजे. आम्ही गुलाम नाही तर मालक आहोत . साभार :-
विजयकुमार घोटे

Read more ...

Tribal representatives in Maharashtra Assembly 2014

Congratulations!
To newly elected all MLA’s and specially to from reserve constituency, as we expect important role in protecting Tribal rights, Tribal development & tribal identity!

www.jago.adiyuva.in

हार्दिक अभिनंदन !
सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना सुभेच्छा, विशेष करून राखीव जगावरून निवडून आलेले २५ आमदार आदिवासी समाजाच्या अस्तित्व, विकास आणि अस्मिते साठी आपला सदैव पुढाकार अपेक्षित आहे.

ST Reserved Constituency results 2014

1 : AKKALKUWA - ADV. K.C.PADAVI (INC)
2 : SAHADA - PADVI UDESING KOCHARU (BJP)
3 : NANDURBAD - GAVIT VIJAYKUMAR KRUSHNARAO (BJP)
4 : NAWAPUR - NAIK SURUPSING HIRYA (INC)
5 : SAKRI - AHIRE DHANAJI SITARAM (INC)
6 : SHIRPUR - KASHIRAM VECHAN PAWARA (INC)
7 : CHOPDA - SONAWANE CHANDRAKANT BALIRAM (SS)
8 : MELGHAT - BHILAWEKAR PRABHDAS BABULAL (BJP)
9 : AMGOAN - PURAM SANJAY HANWANTRAO (BJP)
10 : ARMORI - KRUSHNA DAMAJI GAJBE (BJP)
11 : GADCHIROLI - DR. DEORAO MADGUJI HOLI (BJP)
12 : AHERI - AMBRISHRAO RAJE SATYAVANRAO ATRAM (BJP)
13 : RALEGOAN - PRO. DR. ASHOK RAMAJI WOOIKE (BJP)
14 : ARNI - RAJU NARAYAN TODSAM (BJP)
16 : BAGLAN - CHAVAN DIPIKA SANJAY (NCP)
17 : KALWAN - GAVIT JIVA PANDU (CPM)
18 : DINDORI - ZIRWAL NARHARI SITARAM (NCP)
19 : IGATPURI - GAVEET NIRMALA RAMESH (INC)
15 : PALGHAR - GHODA KRUSHNA ARJUN (SS)
20 : DAHANU - DHANARE PASKAL JANYA (BJP)
21 : VIKRAMGAD - SAVARA VISHNU RAMA (BJP)
22 : BOISAR - TARE VILAS SUKUR (BVA)
23 : BHIVANDI RRL - SHANTARAM TUKARAM MORE (SS)
24 : SHAHAPUR - BARORA PANDURANG MAHADU (NCP)
25 : AKOLE - PICHAD VAIBHAV MADHUKAR ( NCP)

Read more ...

आदिवासी समाजाचे अस्तित्व या निवडणुकितील प्रलोभनांना दान करू नका.

ऊमेदवार कुठलाही असो , कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो अश्या नेत्याला निवडून द्या की त्यांना आदिवासी समाजा साठी काहीही करण्याची तळमळ असावी, जेने करून अशी व्यक्ती निवडून द्या जि समाजा साठी बांधिल असेल ति व्यक्ती आदिवासी असेल ।
आपल्या लढाईचे अस्तित्व सुरक्षित आणि अबाधित राखण्यासाठी आपल्या समस्या सोडविणारा उमेदवार निवडून द्या.
आपल्या आदिवासी समस्यांचे भांडवल करून सत्ता भोगणारांना त्यांची लायकी दाखवून द्या.
आदिवासी समाजाचे अस्तित्व या निवडणुकितील प्रलोभनांना दान करू नका.
मत हा अधिकार आहे. त्याचा समाज विकासासाठी वापर करा.
आज अनेक जण आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर वार करत आहेत. असे असताना आपण याच्या भूल थापांना बळि पडू नका. योग्य विचार करा. आपल्या मताचा सामाजिक लाभ घडवून आणा.
स्वातंत्र्याची फळे ओरबाडून खाणा-या राजकीय पुढा-यांना समाज विकासासाठी हट्ट धरा.
एखादे काम कबूल करून घ्या. किंवा ठनकाऊन सांगा आमची मते तूम्हाला परंतु आमच्या गावचे कुठलेही काम अडून पडता कामा नये.
पैशांचा मोह टाळा .पैसे घेऊन आपले व आपल्या पुढिल पिढी चे भविष्य विकु नका.
जय आदिवासी, जय एकलव्य, जय बिरसा मुंडा
Read more ...

आरक्षणविरोधाची अजितदादांना धग

धुळे : नंदुरबारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी स्थानिक आदिवासींचा रोष सहन करावा लागला. धनगर समाजाला अनुसूचित जामातीत आरक्षण देण्याला विरोध करत आदिवासी बांधवांनी अजित पवारांची गाडी १५ मिनिटे रोखून धरली. पोलिसांना बळाचा वापर करत पवारांना मार्ग मोकळा करून द्यावा लागला. 

राष्ट्रवादीतर्फे नंदुबारमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पवार आले असता, आदिवासी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्यासाठी नंदुरबार-धुळे चौफुलीवर गर्दी केली होती. या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले. त्यानंतर गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. मात्र, थोड्याच वेळात आंदोलकांनी नवापूर चौफुलीवर पवारांच्या गाड्यांचा ताफा रोखून धरत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Read more ...
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti